मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
अस्थि ठेवण्याचा विधि

धर्मसिंधु - अस्थि ठेवण्याचा विधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


प्रथम अस्थिसंचयनाचे दिवशीं अस्थि ठेवण्याचा प्रकारः-- मौन धारण करुन प्रेताचे स्थानीं बळी देऊन दुधानें चितास्थान प्रोक्षण करावें. प्रेताच्या मुख्य आंगाच्या अस्थि घ्याव्या. नंतर त्यास पंचगव्यानें स्नान घालून क्षौम वस्त्रानें बांधून मृत्तिकेच्या नवीन चांगल्या भांड्यांत घालून झांकण घालावें व अरण्यांत अथवा शुद्ध वृक्षाच्या मुळाशी पुरुन ठेवाव्या. नंतर सूक्ष्म अस्थि व ती रक्षा नेऊन उदकांत टाकावी. यावर गोमययुक्त उदकानें भूमीचें संमार्जन करुन पुष्प, धूप इत्यादिक व बळी यांनी पूर्वीप्रमाणें पूजा करावी. नंतर पुत्र, दौहित्र किंवा सखा भ्राता ह्यांतून कोणीही त्या स्थानापासून अस्थि नेऊन तीर्थात किंवा जान्हवीच्या उदकांत टाकाव्या. मातेचें कुल व मित्रकुल यांवांचून अन्य कुलांतील मनुष्याच्या अस्थि नेल्यास नराधम होय. त्यानें चांद्रायण करावें. ज्या पुण्यवंताच्या अस्थि गंगेच्या उदकांत पडल्या त्याची शाश्वत अशा ब्रह्मलोकापासून पुनरावृत्ति होत नाही. गुरुशुक्रांचे अस्त व मलमास असतां गंगेंत अस्थि टाकूं नयेत, असें गौतम म्हणतो. १० दिवसांच्या आंत अस्थि टाकणें असल्यास अस्तादि दोष नाही. १० दिवसांचे आंत ज्याच्या अस्थि गंगेंत टाकल्या त्यास गंगेच्या ठायीं मरण प्राप्त झालें असतां जें फळ मिळतें तें मिळेल.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP