मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
साग्निकाचा विशेष निर्णय

धर्मसिंधु - साग्निकाचा विशेष निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


जो गृह्याग्नियुक्त असेल त्याचा गृह्याग्नीनें व श्रौताग्नियुक्त असेल त्याचा तीन श्रौताग्नींनीं दाह करावा. गृह्याग्निमान् व श्रौताग्निमान् यांचें मरण कृष्णपक्षांत झाल्यास तत्कालीन सायंकाळच्या आहुती दर्श सायंकाळपर्यत पक्ष होमाप्रमाणें एकदांच घेऊन होम करवा, व पुनः संकल्पपूर्वक प्रातःकाळच्या आहुति प्रतिपदेच्या प्रातर्होमानंतर तसेंच हवन करुन दर्शयाग करावा. यागाचा असंभव असल्यास आज्यास संस्कार करुन तें स्त्रुचिपात्नांत ४ वेळ घ्यावें; व ' पुरोन वाक्या ' व ' याज्या ' या दोन मंत्रांनी एकेक प्रधानाहुति द्यावी. स्मार्ताग्नीचें ठायीं ४ वेळ घेतलेल्या आज्यानें '' अग्नये स्वाहा इंद्राग्निभ्यां स्वाहा '' अशा नाममंत्रानेंच २ प्रधानाहुति द्याव्या. शुक्ल पक्षांत रात्रीं मरण आल्यास सायंकाळचा होम केला असल्यामुळें प्रातःकाळचा होम मात्न अपकर्षानें तत्कालींच करावा. शुक्लपक्षीं पौर्णिमान्त अथवा दर्शात होम अथवा इष्टि, प्रधान असलेल्या पूर्णाहुति हीं करण्याचें कारण नाही. शुक्लपक्षांत दिवसा मरण आल्यास कोणत्याही होमाचा अपकर्ष नाहीं. याप्रमाणें कृष्णपक्षांत मरण आल्यासही दैववशात् पूर्णमासेष्टीचा अतिक्रम असल्यास होमाचा अपकर्ष करणें प्रधान पूर्णाहुति इत्यादिक आरंभ झाला नसल्यामुळें कृताकृत आहे, असें वाटतें. कर्णपक्ष असल्यास अतिक्रांत पूर्णमास, पूर्णाहुति यांचें हवन करुन पक्षहोम करुन पूर्णाहुति कराव्या. अरणीवर अग्निसमारोप केला असतां जर पति मृत होईल तर प्रेतास स्पर्श करुन अग्निमंथन करावें; व प्रस्यवरोह मंत्राचा जप करुन १२ वेळ घृत घेऊन अमंत्रक हवन करावें व नंतर प्रेतक्रिया करावी. विच्छिन्न श्रौताग्नीस मरण आल्यास प्रेताधान करावें. तें असें:-- प्रेतास अग्निशाळेंत ठेवून जवळ अरणी ठेवून '' यस्याग्नयो जुव्हतो मांसकामाः संकल्पयंते यजमानमांसं । जायन्तु ते हविषे सादिताह स्वर्ग लोकमिमं प्रेतं जयन्तु '' या यजुर्मत्रानें मंथन करुन अग्निकुंडांत नेऊन १२ वेळ घेतलेल्या आज्यानें अमंत्रक होम करावा व त्या अग्नीनें दहनादिक करावें. अग्नी नष्ट झाले असतां व अरणीचा नाश झाला असतां यजमान मृत झाल्यास '' मनोज्योति० '' या ऋचेनें २ अरणी कराव्या. शेषकर्म पूर्वीप्रमाणेंच करावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP