मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
अशौचीयाचे अन्न भक्षण

धर्मसिंधु - अशौचीयाचे अन्न भक्षण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अशौचीयाचे अन्न भक्षण केल्यास - असगोत्री असून आपत्काल नसताना बुद्धिपूर्वक १ वेळ जर अशौचीयाने शिजलेले अन्न भक्षण करील तर त्या दिवसापासून जोपर्यंत अशौच अवशिष्ट आहे तोपर्यंत अशौच धरावे. अशौचसमाप्तीनंतर ब्राह्मणाचे अशौच असल्यास सांतपन प्रायश्चित्त व शूद्राचे अशौच असल्यास चांद्रायण प्रायश्चित्त करावे. कलियुगात क्षत्रियादिकांचा अभाव असल्यामुळे त्यांच्याविषयी लिहीत नाही. क्वचित ग्रंथी लेख आहे. पण तो विशेषतः स्पष्टीकरणार्थ असून विद्यमान काली त्याचा उपयोग नसल्यामुळे बहुधा त्याची उपेक्षा केली जाते. बुद्धिपूर्वक अभ्यास असता ब्राह्मण व शूद्र यांचे अशौचाविषयी क्रमाने मास, सहा मासपर्यंत कृच्छ्रादि व्रतांचे आचरण करावे. न जाणुन भोजन केल्यास जोपर्यंत अन्नाचा पाक होईल तोपर्यंत अशौच धरून क्रमाने १ रात्र, व सप्त रात्र उपोषण करून १० व १०० प्राणायाम करावे. न जाणून अभ्यास असता दुप्पट करावे. आपत्काली न जाणून भोजन केल्यास तो दिवस अशौच धरून १ प्राणायाम करावा. शूद्रास अशौच असता १००८, अष्टादिक सहस्त्र गायत्रीजप करावा. आपत्काली जाणून भक्षण केल्यास ३ वेळ अघमर्शण व १००८ अष्टादिक सहस्त्र गायत्रीजप करावा. शूद्राचे अशौच असता प्राजापत्य करावे. द्विजाचे अशौच असता शूद्राने स्नान व पंचगव्य प्राशन करावे. हे सर्व जननाशौच असता कमी योजावे. याप्रमाणे आहिताग्नीचे अशौचाविषयी न्यून योजावे असे स्मृत्यर्थसार ग्रंथात सांगितले आहे. ज्याचा स्वामी अशौची आहे त्याचे अन्न भक्षन केले असता हा सर्व निर्णय जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP