मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
अशौच संपात निर्णय

धर्मसिंधु - अशौच संपात निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


दहा दिवसाचे मृताशौच असता त्यात दहा दिवसांचे किंवा त्याहून कमी असे मृताशौच प्राप्त झाल्यास पूर्वी प्राप्त झालेल्या अशौचाची समाप्ती झाल्याने शुद्धि होते. १० दिवसांचे जननाशौचात जर १० दिवसांचे किंवा त्याहून कमी दिवसांचे जननाशौच प्राप्त होईल तर पुर्वी प्राप्त झालेल्या जननाशौचाची समाप्ति झाल्याने शुद्धि होते, १० दिवसांच्या मृताशौचात १० दिवसांचे किंवा ३ दिवसांचे जननाशौच प्राप्त झाल्यास मृताशौचाची समाप्ति होताच समाप्ति होते. ३ दिवसांचे मृताशौच असता ३ दिवसांचे किंवा त्याहून कमी असे मृताशौच किंवा ३ दिवसांचे जननाशौच प्राप्त झाल्यास पूर्वी प्राप्त झालेल्या अशौचाची समाप्ति होताच शुद्धि होते. ३ दिवसांचे जननाशौचात ३ दिवसाम्चे जननाशौच प्राप्त झाल्यास पूर्वीच्या अशौच्याच्या अंती शुद्धि होते. पक्षिणी मृताशौचात पक्षिणी व एक दिनात्मक यातून एखादे मृताशौच प्राप्त झाल्यास पूर्वीच्या अशौचाच्या अंती शुद्धि होते. समान किंवा अधिक अशा जननाशौचाने मृताशौचात दूर होत नाही. पक्षिण्यादि रूप मृताशौचाने ३ दिवसांचे व १० दिवसांचे जननाशौच व ३ दिवसांचे मृताशौचाने १० दिवसांचे जननाशौच ही जात नाहीत असे बहुत ग्रंथकार म्हणतात. काही ग्रंथकार असे म्हणतात की, कमी अशा मृताशौचाने अधिक अशा जननाशौचाची निवृत्ति होते. ३ दिवसांचे मृताशौचाने १० दिवसांचे मृताशौच जात नाही. याप्रमाणे पक्षिणी अशौचाने ३ दिवसांचे व एक दिवसाच्या अशौचाने पक्षिणी अशौच जात नाही. ३ दिवसांच्या जननाशौचाने १० दिवसांचे जननाशौच जात नाही.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP