एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अमेध्यलिप्तं यद्येन गन्धं लेपं व्यपोहति ।

भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते ॥१३॥

पात्र पीठ कां आसन । अमेध्यलिप्त झाल्या जाण ।

त्या गंधाचें निःशेष क्षालन । तेणें पवित्रपण तयासी ॥४६॥

नाभीखालता ज्याच्या शरीरा । अमेध्यलेप लागल्या खरा ।

ते ठायींचा गंधु जाय पुरा । ऐसें धुतल्या त्या नरा शुचित्व लाभे ॥४७॥

नाभीवरतें अमेध्यलेपन । अवचटें झालिया जाण ।

तैं करावें मृत्तिकास्नान । तेणें पावन तो पुरुष ॥४८॥

मळ धुतल्या तत्काळ जाती । परी त्या गंधाची होय निवृत्ती ।

प्रकृति पावे जैं निजस्थिती । `मळनिष्कृति' त्या नांव ॥४९॥

बाह्य पदार्थ निवृत्तिनिष्ठें । वेद बोलिला या खटापटें ।

आतां कर्त्याचें शुचित्व प्रकटे । ते ऐक गोमटे उपाय ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP