एकनाथी भागवत - श्लोक १९ व २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


विषयेषु गुणाध्यासात्पुंसः सङ्गस्ततो भवेत् ।

सङ्गात्तत्र भवेत्कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥१९॥

कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते ।

तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम् ॥२०॥

विषयांचें गोडपण । सदा ध्याय ज्याचें मन ।

त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥१३॥

विषयासक्तीचा संभ्रम । तेणें निर्लज्ज खवळे काम ।

कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥१४॥

विषयकामार्थ जे उपाय । त्यासी प्रतिपदीं अपाय ।

जेव्हां विषयकामसिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥१५॥

जेथ अतिजल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेंसीं सन्नद्ध ।

खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥१६॥

क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचें तत्काळ नासे ज्ञान ।

तेव्हां विवेकाचें प्राशन । करी जाण महामोह ॥१७॥

विवेकाचें लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण ।

तेव्हां कार्याकार्य‍आठवण हेंही स्मरण बुडालें ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP