एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अकृष्णसारो देशानामब्रह्मण्योऽशुचिर्भवेत् ।

कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासंस्कृतेरिणम् ॥८॥

कोणे एके पृथ्वीतळीं । मेघ न वर्षतां जळीं ।

पेरिलीं धान्यें सदा निळीं । वसुधा-जिव्हाळी ते म्हणती ॥८१॥

तेंचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागीं गा उखरी ।

मेघ वर्षतां शरधारीं । अंकुरेना डिरी उखरत्वें ॥८२॥

तेवीं देशाची शुद्ध्यशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी ।

जेथ कर्मीं नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धी न करावें ॥८३॥

कृष्णामृग जेथ नाहीं । ते जाण पां अपवित्र भुयी ।

कर्मादरु तिये ठायीं । न करावा पाहीं सर्वथा ॥८४॥

जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाहीं ।

ब्राह्मण अकर्मीं जे ठायी । भूमी तेही अपवित्र ॥८५॥

जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखों हेळूनि निंदिती ।

तो देश गा कर्माप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥८६॥

जे देशीं कृष्णमृग असती । परी नाहीं भगवद्‍भक्ती ।

तो देश कर्मप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥८७॥

भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीकट कलिंग मागध ।

तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥८८॥

नाहीं उपलेप संमार्जन । ते स्वगृहीं भूमी अशुद्ध जाण ।

कां जेथ वेदबाह्य असज्जन । तेंही स्थान अपवित्र ॥८९॥

जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र ।

आतां काळाचें काळतंत्र । पवित्रापवित्र सांगेन ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP