स्वात्मसुख - स्वात्मसुखाचें महत्त्व

’ स्वात्मसुख ’ या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.


स्वात्मसुख येणें नांवें । हा केवळ ग्रंथ नव्हे । येणे रहस्य अनुभवावें निजात्मसुख ॥१२॥

जें आत्मसुखें सुरत । त्यांसि पढियंता हा ग्रंथ । जे आत्मसुखा आर्तिवंत । तेहीं ग्रंथार्थ घ्यावा ॥१३॥

हो कां पतिसुखालागीं गोरटी । सासूसासर्‍यासी मानी मोठीं । तैसे प्रमेय सुनी दिठी । पहावा ग्रंथ ॥१४॥

जैसी द्राक्षीच्या घडीं । गोडीयेहूनि अधिक गोडी । तैसी वोवीयेहूनि चढी । वोवी आहे ॥१५॥

जैसें चंद्रकिरणी अमृत भरलें । तें चकोरासीचि भागा गेलें । तैसें आत्मसुख उपाइलें । निर्मत्सरासी ॥१६॥

पहाहो तें आत्मसुख कैसे । हें वारंवार मज पुसें । तरी करतलामलकविन्यासें । सांगेन आइका ॥१७॥

जैसा मर्दण्याला विकळ । कळे प्राप्तिसुख कल्लोळ । तैसें सुख सदा केवळ । कळेवीण साधूसी ॥१८॥

आत्मसुखप्राप्तीसाठीं सदगुरुचे पाय धरणें हच एकमात्र मार्ग

अहो तें आत्मसुख सकळां आहे । परी ठाउकें नव्हे कीजे काये । यालागीं धरावे सदगुरुचे पाये । तैं भावार्थ प्राप्ती ॥१९॥

सदगुरु तोचि ब्रह्ममूर्ति । भावार्थे करितां अनन्यभक्ती । शिष्या स्वात्मसुखाची प्राप्ती । हीय निश्चिती तत्काळ ॥४२०॥

आतां ब्रह्मज्ञानाची किल्ली । सांगेन एक्याचि बोलीं । जयांची कल्पना निमाली । ते प्राप्त पुरुष ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP