स्वात्मसुख - ग्रंथाची निर्मित्ती

’ स्वात्मसुख ’ या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.


जे आपुली स्वरुपस्थिती । ते वानावी अभिनव कीर्ती । जेणें संतसज्जन होती । संतुष्ट सदा ॥११॥

आतां संतांच्या मनोगतीं । तेंचि बोलावें प्रस्तुती । तरी सांगों स्वरुपस्थिती । सुनिश्चित ॥१२॥

तरी कठिणांशु करुनि वेगळ । पहातां जैशी स्फटिकशीळ । तैसें जाण सकळ । स्वरुप असे ॥१३॥

सांडूनी आर्द्रतेचा रोहो । नाडळत भरला डोहो । तैसी ते वस्तु पहाहो । सर्वत्र असे ॥१४॥

जडत्व सांडूनि निश्चळ । वसुधा जैसी पुष्कळ । तैसें ज्ञेय सकळ । सकळिक असे ॥१५॥

गगन सर्वांसी स्पर्शे । परी स्पर्शिलें हें न दिसे । आत्मा तैसा सन्निध असे । आडळेविण ॥१६॥

शून्यत्व सांडूनि गगनें । सर्वत्र जेवीं असणें । आत्मा तैसा पूर्णपणें । सर्वदा सर्वीं ॥१७॥

जें नाडळें स्पर्शनीं । घसवटेना जनघसणीं । शून्या शून्यत्व करोनी । संविती असे ॥१८॥

जेवीं वर्ततांही जगीं । नाडळत आडळे आंगीं । अंगा अंगत्व संयोगी । नुरऊनि असे ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP