मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सत्ताविसावा|
श्लोक ४३ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


दत्वाऽऽचमनमुच्छेषं; विष्वक्‍सेनाय कल्पयेत् ।

मुखवासं सुरभिमत्ताम्बूलाद्यमथार्हयेत् ॥४३॥

एवं विसर्जिलिया ध्यान । झालें देवाचें भोजन ।

ऐसें भावूनि आपण । शुद्धाचमन अर्पावें ॥२६॥

अग्नीमाजील मूर्तिध्यान । प्रतिमा पूजिली जे आपण ।

दोहीं ठायीं शुद्धाचमन । यथोक्त जाण करावें ॥२७॥

देवाचिया भुक्तशेषासी । भाग द्यावा विष्वक्‍सेनासी ।

मग काढूनि उच्छिष्टासी । द्यावें देवासी करोद्वर्तन ॥२८॥

कापुरें घोळिवा सुपारी फोडी । सुवर्णवर्णा पानांची विडी ।

काथ सुवासिला परवडीं । अभिनव गोडी तांबूला ॥२९॥

एळा लवंगा कंकोळ । अल्प अर्पिलें जातीफळ ।

सुरंग रंगलें तांबूल । दिसे मुखकमळ साजिरें ॥३३०॥

चोवा कस्तूरी बुका सधर । अर्पूनि पुष्पांजळीसंभार ।

जेणें शीघ्र संतोषे श्रीधर । तें प्रेम साचार हरि सांगे ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP