एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदि प्राप्तिं विघातं च जानन्ति सुखदुःखयोः ।

तेऽप्यद्धा न विदुर्योगं मृत्युर्न प्रभवेद् यथा ॥१९॥

दुःख निरसूनि सुखप्राप्ती । यालागीं कर्मे आचरती ।

कर्मवादी ज्ञाते म्हणविती । तेही नेणती दुःखनाशु ॥७९॥

कर्में करितां नाशु नोहे । ऐसें दुःख कोण आहे ।

पुसशील तरी पाहें । यथान्वयें सांगेन ॥४८०॥

मरणांवरतें दुःख चढे । ऐसें दुःख तंव नाहीं पुढें ।

तें निवारूं नेणती बापुडे । अति बळ गाढें मृत्युचें ॥८१॥

आंतु घालितां हातु पोळे । तेणें उन्हवणेंन घर न जळे ।

तैसा कर्में मृत्यु न टळे । प्रबळबळें अनिवार ॥८२॥

मारिता मृत्यु जेणें मारिजे । तो उपावो कर्मठीं नेणिजे ।

कर्मांमाजी जेणें असिजे । अचुक पाविजे तेणें मृत्यु ॥८३॥

अंतीं येईल मरणदुःख । जंव जीजे तंव भोगिजेल सुख ।

हें बोलेणे बोलती मूर्ख । जितां सुख त्यां कैंचें ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP