एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तत्रापि कर्मणां कर्तुरस्वातन्त्र्यं च लक्ष्यते ।

भोक्तुश्च दुःखसुखयोः कोन्वर्थो विवशं भजेत् ॥१७॥

जीवासी असती स्वतंत्रता । तरी तो दुःखभोगु न भोगिता ।

सदा सुखीचि असता । पापें न करिता अळुमाळु ॥४२॥

जीवु बापुडें सदा दीन । कर्में करूनि कर्माधीन ।

कर्मफळदाता तो भिन्न । सुखदुःखें जाण तो भोगवी ॥४३॥

यालागीं ईश्वराची सत्ता । तो कर्मफळाचा दाता ।

जीवु सुखदुःखांचा भोक्ता । स्वतंत्रता त्या नाहीं ॥४४॥

ऐसें लक्षितां लक्षण । जीवु तितका पराधीन ।

पराधीनपणें जाण । भोगी दारुण सुखदुःख ॥४५॥

मजलागीं दुःख होआवें । ऐसें कोणी भावीना जीवें ।

न वांछितां दुःख पावे । येणें न संभवे स्वतंत्रता ॥४६॥

श्रुतिस्मृतींतें विचारितां । जीवासी नाहीं स्वतंत्रता ।

पराधीनपणें वर्ततां । भोगी अप्रार्थितां सुखदुःख ॥४७॥

वादी परिहार करिती । साङ्ग कर्म जे नेणती ।

ते ते जीव दुःखी होती । सुख पावती कर्मज्ञ ॥४८॥

जे सदाचार श्रोत्री । जे याज्ञिक अग्निहोत्री ।

जे उभयलोकव्यापारी । साङ्ग करी कर्मातें ॥४९॥

जे अविकळ अव्यंग । कर्में करूनियां साङ्ग ।

उभय लोकीं सुखभोग । कर्मयोग भोगती ॥४५०॥

कर्मीं ज्याची योग्यता । तो सुखभोगाचा भोक्ता ।

हेंहि न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP