मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची|

धर्मदास बाबा जीवन चरित्र

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे.


धर्मदास बाबांचे जीवन हे सिद्ध पुरुषांच्या मांदियाळीतले होते. बाबांचे मुळगाव खापरी मुरबाड येथे अजोळी जन्म झाल्यामुळे ते मुळगाव ठरले गेले. बाबांच लहानपण म्हणजे.. मोटकी देहा कृती उमटे आणि नीज ज्ञानाची पहाट फुटे । सुर्या पुढे प्रगटे । प्रकाशु जैसा। तैसी दशेची वाट न पाहता । वयसेचीया गावा नयेता। बालपणीच सर्वज्ञता । वरी तयाते । तेथ सिद्ध प्रज्ञोचिनी लाभे । मनची सारस्वत दुभे । मग सकळ शास्त्र स्वयंभे । निघती मुखे ।

असे होते, बाबा या जगाशी अकरा वर्ष पर्यंत संवाद करायचा नाही म्हणून आपली मान वक्र करून ११ वर्षा पर्यंत मौन धारण करून राहिले होते. अकराव्या वर्षी शेवटी बाबांना एका सिद्ध पुरुषांनी स्पर्श कृपा करून लावूनिया हाथ कुरवाळीळा माथा। सांगितली चिंता न करावी म्हणून उपदेश केला आणि बाबांची वाणी प्रवाहित होऊन जन सामन्यास सुस्नात करू लागली बाबांचं जन्म हा अक्षय तृतीया या अक्षय मुहूर्ताचा असल्या मुळे बाबांच्या मुखातून यायचं ” माझी जन्म तिथी सर्वच साजरी करतील वेगळी करायची गरज नाही ”

अकराव्या वर्ष पर्यंत गुरराखण्याचं काम केलं आणि बाराव्या वर्षी बाबांनी ब्रह्मचार्य स्वीकारून जगत उध्दारासाठी लौकिक घराचा त्याग केला. प्रथम शहापुरातील काळे पाडा येथे काही दिवस वास्तव्य केले. तेथे मंजुळ दास आणि नामदास या दोन साध्वीनी बाबांचा अनुग्रह स्वीकारून आपलं संपूर्ण जीवन बाबांच्या सेवेसाठी ब्रम्हचार्यव्रत पालण करून समर्पित केले.

नंतर बाबा पुढे श्री क्षेत्र तुंगेश्वर येथे पर्ण कुटी बांधून वास्तव्य करून राहिले. श्री क्षेत्र तूंगेश्वर हे प्राचीन पांडव कालीन शिवालय अशी पूर्वजांकडून माहिती मिळत होती. तसेच हेमाड पंथीय काही अवशेष मंदिराच्या आजूबाजूला काही शिलालेख पाहायला मिळतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP