राम नवमी - दशरथाचा यज्ञाविषयी विचार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सोमवार ता. ७-४-१९३०

अयोध्येसी राजा दशरथ ख्यात । असतां वर्तन काय झाले ॥१॥
सर्व सुखे त्यासी, परी न संतती । चिंता झाली चित्तीं बहु त्याच्या ॥२॥
तवं आले मनी अश्वमेध यज्ञ । करुनी ब्रह्मयज्ञ तोषवावा ॥३॥
बोलावी पुरोहित सकळ प्रधान । सकळ विद्वान बोलावीत ॥४॥
तपोधन सारे बोलावित राजा । यज्ञ, पुत्रकाजा, करणे म्हणुनी ॥५॥
अश्वमेध यज्ञे तोषवावा हरी । म्हणोनि अंतरी येत माझ्या ॥६॥
तुमचा विचार मज कळवावा । आशिर्वाद द्यावा महंत हो ॥७॥
सकळांनी तेव्हां अनुमोदियेले । अनुज्ञेत दिले संतोषाने ॥८॥
सकळ राण्यांसी भेटतसे नृप । व्रतस्थ साक्षेप रहावित ॥९॥
यज्ञदिक्षा घेणे मनांत आणिले । प्रजेसाठी भले म्हणे राजा ॥१०॥
सकळ राण्यांसी हर्ष थोर झाला । विचार पटला सकलांसी ॥११॥
मग सुमंत्रांसी सांगे नृपवर । सिद्धता साचार करावी हे ॥१२॥
विनायक म्हणे पुढील अनुसंधान । लावोनियां मन ऐकावे की ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP