प्रल्हाद चरित्र - भाग ६

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां ।
माझा प्रर्‍हादु असे वो केउता । तो कवणें पां गांजिला ॥१॥
वदन पसरूनि विक्राळ । झरझरीत झरे लाळ ।
नेत्र जैसें वडवानळ । शोषु पाहे जलनिधी ॥२॥
संहार झालें नागकुळ । भ्याले अष्ट लोकपाळ ।
स्वर्गीं सुटली खळबळ  । अमरावती इंद्रासीं ॥३॥
मग दैत्यातें पाचारितु । लोह खणखणा वाजतु ।
धाकें अंबर गर्जतु । तेणें कांपे मेदिनी ॥४॥
वेटाळूनि चहूं हातीं । विदारिला चपेट घातीं ।
जैसा रुद्र प्रळ्यांतीं । तैसा हरी दिसतसे ॥५॥
दैत्य न मरे कवणेपरी । मग धरिला जानूवरी ।
नखें उदर फाडूनि सत्वरीं । अस्थिचुर्ण केलिया ॥६॥
भोजें नाचत देवता । मुक्ति झाली दैत्यनाथा ।
नामया स्वामि वरदहस्ता । अभय दाता भक्तांसी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP