अध्याय सदतीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


कीं नैषधरायाची राणी ॥ पूर्वीं पडिली घोरवनीं ॥ कीं भिल्लीवेषें भवानी ॥ एकटी काननी जेवीं हिंडे ॥१॥

एक मार्ग न दिसे तेथ ॥ सव्य अपसव्य वनीं हिंडत ॥ दीर्घस्वरें रुदन करित ॥ तों नवल एक वर्तले ॥२॥

तेथें कंदमुळें न्यावयासी ॥ वना आले वाल्मीक ऋषी ॥ तो त्रिकाळज्ञानी तेजोराशी ॥ ज्याचे ज्ञानासी सीमा नाहीं ॥३॥

अवतारादि जन्मपत्र ॥ जेणें रामकथा केली विचित्र ॥ तेणें जगन्मातेचा शोकस्वर ॥ कर्णीं ऐकिला हिंडता ॥४॥

सीता देखिली दुरोनी ॥ जवळी येत वाल्मिक मुनी ॥ म्हणे आमची तपःश्रेणी ॥ प्रकट जाहली येणें रूपें ॥५॥

म्हणे कोण हे शुभकल्याणी ॥ कीं मूळ प्रकृती प्रणवरूपिणी ॥ कीं अनादिपीठनिवासिनी ॥ दर्शन द्यावया प्रकटली हे ॥६॥

मग म्हणे जवळी येऊन ॥ सांग माते आहेस तू कोण ॥ कां सेविलें घोरवन ॥ कोणें दुःख दिधले ॥७॥

मग बोले जगन्माता ॥ मी मिथिलेश्वराची दुहिता ॥ रावणांतकाची असें कांता ॥ सौमित्रें आणोनि सोडिलें वनी ॥८॥

अन्याय नसतां किंचित ॥ टाकिलें घोर अरण्यांत ॥ परदेशी आहे मी अनाथ ॥ तरी माझा तात केवळ तूं ॥९॥

मग ऋषी म्हणे वो जननी ॥ माझें नाम वाल्मिक मुनी ॥ अयोध्यानाथ कोदंडपाणी ॥ मज बरवें जाणतसे ॥११०॥

त्याचें भाष्य मी करी निरंतर ॥ मज जाणतसे मिथिलेश्वर ॥ तुझा पिता आमुचा मित्र ॥ कन्या साचार तूं माझी ॥११॥

तुज होतील दोन पुत्र पित्याहून पराक्रमी थोर ॥ तुज घातलें जेणें बाहेर ॥ त्याचा सूड घेतील ते ॥१२॥

मग जानकीस हातीं धरून ॥ गेला आश्रमा घेऊन ॥ भोंवते मिळाले ऋषिजन ॥ काय वचन बोलिले ॥१३॥

म्हणती हे कोण आहे ताता ॥ येरु म्हणती जानकी जगन्माता ॥ ऋषि म्हणती अनर्थ तत्वतां ॥ घरासी आणिला साक्षेपें ॥१४॥

आम्ही अत्यंत भोळे ब्राह्मण ॥ टाकोनि ग्राम कुटिल जन ॥ वसविलें घोर कानन ॥ येथेंही विघ्न आणिलें ॥१५॥

इचें सुंदरपण अत्यंत ॥ इजवरी अपवाद बहुत ॥ इचे पायीं आम्हांसी घात ॥ होऊं शके एखादा ॥१६॥

एक म्हणती सीता सती ॥ जरी हे असेल निश्चिती ॥ तरी येथें वळोनि भागीरथी ॥ अकस्मात आणील ॥१७॥

हे जरी नव्हे इचेनी ॥ तरी दवडावी येच क्षणीं ॥ ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ भागीरथीस पाचारीत ॥१८॥

म्हणे सगरकुलतारक माये ॥ हरिचरणोद्भव जन्हुतनये ॥ ब्रह्मकटाह फोडून स्वयें ॥ प्रकट होसी अद्भुत ॥१९॥

कमलोद्भव कमलावर ॥ शिव इंद्रादि सकळ निर्जर ॥ सप्तऋषि मुख्य सनत्कुमार ॥ निरंतर तुज स्तविती ॥१२०॥

तुझें अणुमात्र स्पर्शतां नीर ॥ भस्म होती पापें अपार ॥ शुभ्र समुनांचा दिव्य हार ॥ हा मुकुटीं शुभ्र तेवीं दिसे ॥२१॥

हिमनग भेदोनि साचार ॥ एकसरें भरला सागर ॥ तरी मजकारणें वेगवक्र ॥ जननी धांव या पंथे ॥२२॥

ऋषी सकळ झाले भयभीत ॥ ऐसा ओघ लोटला अद्भुत ॥ आश्रम सांडोनि ऋषी पळत ॥ चित्त उद्विग्न सर्वांचे ॥२३॥

एक सीतेस करी नमन ॥ माते आश्रम जाती बुडोन ॥ आम्हांसी रक्षावया तुजविण ॥ कोणी दुजें दिसेना ॥२४॥

मग सीतेनें प्रार्थूनी ते वेळां ॥ ओघ निश्चळ चालविला ॥ सत्य सती जनकबाळा ॥ ऋषी गर्जती सर्वही ॥२५॥

सकळ ऋषी मिळोन ॥ करिती जानकीचें स्तवन ॥ म्हणती माते तुज छळून ॥ जवळी आणिली भागीरथी ॥२६॥

असो वाल्मीकें आपुले आश्रमांत ॥ जानकीतें ठेविलें तेव्हां गुप्त ॥ सकळ ऋषींचे एक मत ॥ अणुमात्र मात फुटेना ॥२७॥

नव मास भरतां पूर्ण ॥ शुभ नक्षत्र शुभ दिन ॥ माध्यान्हीं आला चंडकिरण ॥ तों प्रसूत जाहली जानकी ॥२८॥

वृद्ध ऋषिपत्न्या धांवोनि ॥ जवळी आल्या ते क्षणीं ॥ तो दोघे पुत्र देखिले नयनीं ॥ शशी तरणीं ज्यांपरी ॥२९॥

प्रथम उपजे तो धाकुटा केवळ ॥ मागुती उपजे तो वडील ॥ असो दोघे जन्मले बाळ ॥ सांवळे जावळे ते क्षणीं ॥१३०॥

वाल्मीक गेले होते स्नानासी ॥ शिष्य धांवत गेले तयांपासीं ॥ दोघे पुत्र जानकीसी ॥ जाहले म्हणून सांगती ॥३१॥

ऐसें ऐकतांच वचन ॥ येरें कुशलहू हातीं घेऊन ॥ जानकीजवळी येऊन ॥ केलें विधान शास्त्ररीतीं ॥३२॥

कुशेंकरून अभिषेकिला बाळ ॥ त्याचें नाव ठेविला कुश निर्मळ ॥ आकर्णनेत्र घननीळ ॥ प्रतिमा केवळ रामाची ॥३३॥

लवावरी निजवूनी ॥ धाकुटा अभिषेकिला तये क्षणीं ॥ त्यासी नाम लहू ठेउनी ॥ सोहळा केला वाल्मीकें ॥३४॥

शुक्ल पक्षीं वाढे चंद्र ॥ की पळोपळीं वाढे दिनकर ॥ तेवीं दोघे राघवेय सुंदर ॥ वाढूं लागले तैसेचि ॥३५॥

दोघांचे लालन पालन ॥ वाल्मीक करी अनुदिन ॥ ऋषिबाळकांत दोघेजण ॥ क्रीडा करिती निरंतर ॥३६॥

सप्त संवत्सर होतां पूर्ण ॥ वाल्मीकें सुरभी आणोन ॥ आरंभिले मौंजीबंधन ॥ मेळवूनि ऋषी बहुत ॥३७॥

चारी दिवसपर्यंत ॥ जो जो पाहिजे पदार्थ ॥ तो सर्वही कामधेनु पुरवित ॥ जाहले तृप्त अवघे ऋषी ॥३८॥

बाळ सुंदर देखोन ॥ बहु ऋषी देती वरदान ॥ वाल्मीकें वेदाध्ययन ॥ दोघांकडून करविलें ॥३९॥

षट्शास्त्री प्रवीण जाहले ॥ सकळ पुराणें करतलामलें ॥ मग रामचरित्र पढविले ॥ शतकोटी ग्रंथ केला जो ॥१४०॥

बाळांचे ज्ञान अत्यद्भत ॥ अधिकाधिक तर्क फुटत ॥ मग मंत्रशास्त्र समस्त ॥ वाल्मीकमुनि सांगे तयां ॥४१॥

मग धनुर्वेद पढवून ॥ हातीं देत धनुष्य बाण ॥ युद्धगति सांगे पूर्ण ॥ दोघेजण धरिती मनीं ॥४२॥

असो चर्तुदश विद्या चौसष्टी कळा ॥ वाल्मीक शिकवी दोघा बाळां ॥ ऋषिपुत्रांचा सवें मेळा ॥ घेऊनि दोघे हिंडती ॥४३॥

नानागोष्टी कौतुकें बोलून ॥ रंजविती जानकीचे मन ॥ कंद मुळें आणून ॥ जगन्मातेपुढें ठेविती ॥४४॥

सत्संग घडता देख ॥ प्राणी विसरे संसारदुःख ॥ तैसें जानकी विसरे सकळिक ॥ खेद मागील त्याचेनी ॥४५॥

दश वर्षें होतां पूर्ण ॥ मृगयेस जाती दोघेजण ॥ नाना श्वापदें मारून ॥ आणिती ओढून दावावया ॥४६॥

एकें दिवशी वनीं हिंडत ॥ तों पर्वतमस्तकीं ध्यानस्थ ॥ एक श़ृंगी तप करित ॥ वाल्मीकाचा बंधु तो ॥४७॥

तो मृगवेष देखोनि पूर्ण ॥ कुशें विंधिला टाकूनि बाण ॥ तत्काळ गेला त्याचा प्राण ॥ प्रेत ओढून दोघे नेती ॥४८॥

वाल्मीक पुसे जवळी येऊन ॥ काय तें आणितां ओढून ॥ येरू म्हणती मृग वधून ॥ आणिला तुम्हांकारणें ॥४९॥

त्याचें आता चर्म काढून ॥ करूं तुम्हांकारणें आसन ॥ वाल्मीक पाहे विलोकून ॥ तंव तो बंधु वधियेला ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP