एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


निमज्ज्योन्मज्जतां घोरे, भवाब्धौ परमायनम् ।

सन्तो ब्रह्मविदः शान्ता, नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥३२॥

प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी ।

तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि जनासी ॥१९॥

अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत ।

ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥४२०॥

यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन ।

त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥२१॥

पडल्या जळार्णवा माझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी ।

तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरुप तारी सज्जननाव ॥२२॥

कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती ।

ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरुप निश्चितीं या हेतु ॥२३॥

कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी ।

कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥२४॥

नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं ।

बुडवूं नेणे धारावर्ती । तारक निश्चितीं निजसंगें ॥२५॥

परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती ।

तळीं राहिए ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥;

दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो ।

त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP