एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अन्नं हि प्राणिनां प्राण, आर्तानां शरणं त्वहम् ।

धर्मो वित्तं नृणां प्रेत्य, सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम् ॥३३॥

जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण ।

प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥२८॥

जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षिती ।

तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥२९॥

संसारीं । पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण ।

ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥४३०॥

माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण ।

त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥३१॥

दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं ।

त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधीना ॥३२॥

प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन ।

निवारुनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥३३॥

संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण ।

त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP