प्रासंगिक कविता - विठ्ठलरूप राम

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


एथें उभा कां श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा  ॥१॥
काय केलें धनुष्यबाण । कर कटावरि ठेवून ॥२॥
काय केली सीताबाई । एथें राही रखुमाबाई ॥३॥
काय केलें वानर-दळ । एथें मेळविले गोपाळ ॥४॥
काय केली अयोध्यापुरी । एथें वसविली पंढरी ॥५॥
काय केली शरयू गंगा । एथें आणिली चंद्रभागा ॥६॥
रामदासीं जैसा भाव । तैसा झाला पंढरीराव ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP