मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक ३२ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीब्राह्मण उवाच ।

सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।

यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह तान्‌ श्रृणु ॥३२॥

क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला ।

निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥

ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी ।

धन्य धन्य तूझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥

राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु ।

पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥

सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न ।

पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥

गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती ।

ते गुरूही मी तूजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥

निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती ।

जे जे सद्‍गुण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥

बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा ।

तेणें मी मुक्त जालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥

संसारु तरावया । मुख्य सद्‍बुद्धि गा राया ।

रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥

सद्‍बुद्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी ।

उसंत नाहीं अहर्निशीं । दूःखभोगासी अनंत ॥२७॥

सद्‍बुद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं ।

मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥

वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्‍बुद्धि सांपडे ।

तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥

आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा ।

जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥

संसारनाशासी मूळ । शिष्य प्रज्ञाचि केवळ ।

तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥

जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें ।

हेयोपादेय‍उपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥

हेचि मर्‍हाठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका ।

जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥

ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें ।

सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥

चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे ।

उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥

ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा ।

भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥

सुपाची दशा ते ऐसी । त्यजी रजःकण भुसासी ।

निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥

स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा रांधणें म्हणें ।

अपक्का परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥

एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा ।

तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा यातींचा ॥३९॥

यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण ।

तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥

जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।

गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥

ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला ।

ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥

एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें ।

राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥

ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी ।

हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥

ऐसें सांगतां अचाट । तूज वाटेल हें कचाट ।

तरी गुरु सांगो श्रेष्ठश्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP