मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३०१ ते ३५०|
शेतकरी आणि कोल्हा

शेतकरी आणि कोल्हा

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


एका शेतकर्‍याच्या शेतात शिरून कोल्ह्यांनी फार धुमाकूळ घातला होता. म्हणून त्यांना पकडण्यासाठी शेतकर्‍याने शेतात एक चाप लावून ठेवला. दुसरे दिवशी सकाळी त्या चापात एक कोल्हा अडकलेला त्याने पाहिला. मग रागाने त्याने त्या कोल्ह्याला शेपटाला तेलाने भिजवलेली फडकी गुंडाळून त्याला आग लावली व सोडून दिले. आगीमुळे होरपळून निघणारा तो कोल्हा धान्याने भरलेल्या एका मोठ्या शेतात शिरला व त्याच्या शेपटाची आग लागून ते सगळे धान्य थोड्याच वेळात जळून गेले. गे नुकसान करून घेतले हे लक्षात आल्यावर शेतकर्‍याला फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य - रागाच्या भरात आपण जे काय करतो, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार माणसाने अवश्य केला पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP