मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही !

दिवाकर - अहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... काय करावें ! आज दारुलाबी खिशांत पैशे नाहींत ! - काय कोंडाबाई ! अहो कोंडाबाई ! काय तुमचें भांडण तरी काय आहे ? अशा आमच्यावर रागावलांत कां ? - काय म्हटलेंत ? काल तुम्हांला ओझ्याला बोलावलें नाहीं, म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या रागावलां ? जाऊं द्या कीं ! उद्यां लागतील तितकीं गिर्‍हाइकें येतील ! मग सगळ्या गवर्‍या तुम्हीच मसणांत नेऊन टाका ! मग तर झालें ? अहो, गिर्‍हाइकें येऊं द्या कीं, मग तुम्हांला पैशेच - पैशे ! - काय त्रास आहे पहा ! अग ए ! कां उगीच गागत आहेस ? गांवांत कोण प्लेग चालला आहे ! - अहो, कोणाचे जीव बी सुचित नाहींत, - आणि ही सटवी मधासधरुन उगीचच भांडत आहे ! - बरें झालें घरांत तेल नाहीं तर ! आणूं कोठून पैशे ? - काय सांगूं कोंडाबाई ! हिच्या रोजच्या या काहारामुळें मला आपल्या जिवाचा अक्शी कंटाळा आला आहे ! - कोण आहे ? दौलतशेट ! या शेटजी, जयगोपाळ, बसा. खरोखर, तुम्हीं तर माझी अगदीं पाठ पुरवली आहे बुवा ! किती पंचवीसच रुपये बाकी राहिली आहे ना ? देऊन टाकीन, - उद्यां संध्याकाळच्या आंत, सगळे पैशे चुकते करतों ! - आतां काय सांगावें ! रामाशपथ, या वेळेला खिशांत एक पैसुद्धं नाहीं ! अहो, आतांपर्यंत मुळी गिर्‍हाइकच आलें नाहीं ! .... ''

१२ नोव्हेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 16, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP