मोरोपंतकृत सप्तशती - अध्याय २

सप्तशतीदेवी माहात्म्य नित्य पठन केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो, विशेषेकरून नवरात्रीत पाठ केल्याने जास्त परिणाम जाणवतात.


देवी अरी बळ नाशें धावें कोपोनि ह्मणत चिक्षुर हा ॥

जाणो करेणुंसि ह्मणे भंगाचा काम धरुनि इक्षु रहा ॥१॥

मेरु शिरीं तोयदसा देवी वरि तो महेषु वृष्टि करी ॥

सिंहीतें माराया वाटे झटतो मंदांऽध दृष्टि करी ॥२॥

देवीं ते शर तोडुनि सोडुनि निज शत्रु काय हानि कर ॥

लीलेनें चि अरिसि करि विरथ् ह्मणति देव काय हा निकर ॥३॥

हय सारथि चाप ध्वज नाशें अत्यंत पाप तो खवळे ॥

अपराधंकरी जैसा द्याया आशींस साप तोख वळे ॥४॥

तीव्रत्वें क्षुरं चिक्षुर तो घेउनि खडग चर्म नव द्यावे ॥

देवी ह्मणे असे म्यां न विलोकुनि शरकर्म न वधावे ॥५॥

आघीं करी हरि शिरीं तो समरीं चिक्षुर प्रहारातें ॥

जरि ही ल्याला होता या समरें चिक्षुरप्र हारातें ॥६॥

मग जो वर तेजाचा लावण्याचा हि सव्य भुज गाभा ॥

खंगे करुनि हाणी चिक्षुर त्या परमभव्यभुजगाभा ॥७॥

देवी बाहु स्पर्शें गेला तत्काळ उडुनि करवाल ॥

तरुण रवि ज्यांत लोपे त्या तेजीं काय उडु निकर वाल ॥८॥

सोसे न तिची त्या जसि काशीची नीचमद्रका लीला ॥

क्षेपी शुल क्षोंमें लक्षुनि तो क्षुद्र भद्रकालीला ॥९॥

अहि वरि गरुड तसा ती त्या वरि निज शुल अंबिका घाडी ॥

ताडी त्या शुलातें भस्म करुनि चिक्षुरासि ही पाडी ॥१०॥

महिष चपुपति मरतां त्रिदशार्दन मत्तसिंधुरारुढ ॥

चामर पामर टाकी शक्ति महाशक्ति वरि महामुढ ॥११॥

शक्ति पडे की तीचा मद हुंकारे चि चंडिका उतरी ॥

वाटे मुर्छित पडली ती सिंहींने दटाविली कुतरी ॥१२॥

खंडी शुल ही दुर्गा ज्यासि झुगरी अंराति चामर तो ॥

न वधीं स्वयें तयां कीं सापडतो मृगवरा तिच्या मरतो ॥१३॥

तों तो चढला आरिच्या हस्ति शिरीं सिंह उडुनि वेगानें ॥

ज्या उदनगाग्रगशशि सदृशाच्या सर्व उडु निवे गानें ॥१४॥

असुरांची काळ मुखीं द्याया भय पर मनीं चमु ढकली ॥

जो हरि करी तयाशी तो चामर परम नीच मुढ कली ॥१५॥

मेळविती सुभट यशें करुनि तनु त्याग ज्या वरुनि महितें ॥

भुजयुद्ध करित दोघे ते आले त्या गजा वरुनि महितें ॥१६॥

हरि शिरला द्रुत कंदुकें महि वरुनि उडुनि जसा नभीं शिरतो

पुनरपि पडोनि उडवी तत्काळ चि त्या सुराऽरिचेंशिर तो ॥

बाधिला वृक्षाशिळांहीं दुर्गेने तो उदग्र समरांत ॥

जेणें तेज मिरविलें होतें हो तें असह्या अग्ररांत ॥१८॥

मथिला कराळं हि रणीं व्यापरुनि स्व्दंत मुष्टितळें ॥

केलें सुयश करावेम जीवां द्यायासि जेविं तृष्टि तेळें ॥१९॥

कोपोनि उद्धतातें चुर्ण करी इश्वरी गदा पातें ॥

तें कुतुक देखत्याचें बा एक हि न लवलें तदा पातें ॥२०॥

तैसें चि भिंडिपाळें रण रंगी बाष्कळांसि ती निवटीं ॥

जीची स्मृति न उरों दे दुःखासि पुढें तमा जसे दिवटी ॥२१॥

चुर्ण करे बणांही ताम्रासि तसें च अंधकेलाही ॥

पक्षीश्वरद्दष्टिपुढें केवळ होतो चि अंध कालाऽही ॥२२॥

उग्रास्य उग्रवीर्य त्रिदशांचा रिपु महोहनु हि तिसरा ॥

हे मारुनि त्रिशुलेंत्यांस ह्मणे पुर्व कुमातिला विसरा ॥२३॥

त्या ही बिडालक्षाचें केलें खंगें शिरोऽब्ज कर्तन हो ॥

कीं हर्षे विधि हरि हर लोकपतिसमांत गान नर्तन हो ॥२४॥

दुर्घर दुर्मुख हि रणींबाणांही यमगृहासि पाठविले ॥

ज्यांचे अपकार सदा देवांही हाय ह्याणुनि आठविले ॥२५॥

बळ नाशें महिषासुर खवळे पापाग मोह ल्याला जो ।

तो कां न ह्याणेल निपट बाळ यमाच्या गमो हल्या लाजो ॥

तो कोप आंत बाहिर ह्याणवाया त्रिभुवना अहह ल्याला ॥

गण बळ मर्दी तेव्हा प्रळयींचे लाजले अह हल्याला ॥२७॥

किती गण तुंडाघातें वधिले महिषाऽसुरें रणीं रागें ॥

कितिक खुर क्षेपांही पद्म जसें मर्दिजें महानागें ॥२८॥

पुच्छें किर्ती लोळविले किति शृंगाहीं विदारिले क्रुरें ॥

निश्वास वेग नाद भ्रमणांहीं कितिक नाशिले शुरें ॥२९॥

झालें प्रथम बळ पतन सर्व सविस्तर न बोलवे गा तें ।

धांवे हरिशि वधाया पवनाच्या करुनि फोल वेगाते ॥३०॥

येतां निजसिंहा वीर पाहे कोपोनि अंबिका याला ॥

झालें चि ह्मणे याच्या मित्र जल तृणाऽग्रलंबि कायाला ॥३१॥

तें महिष करी चेष्टित करितो सोडुनि सोय रेडा जें ॥

सुर ह्मणति शेवटींचे सुखवाया गृध्र सोयरे डोजें ॥३२॥

शृंगांहीं गिरि उडवी वेग भ्रमणें चि भुमिला फाडी ॥

उसळोनि जलधि बुडवि तो पुच्छे त्यासि जेधवां ताडी ॥३३॥

त्याच्या शृगांघातें बहु झाले खड खंड घन झडले ॥

श्वासे उडोनि गगनीं गेले तृणसे पुन्हा अचळ पडले ॥३४॥

या परि बळ मायांच्या फुगला होता मनीं लुलाया शतें ॥

किती वर्नावं कथितों जगदंबेचें नृपा तुला यश तें ॥३५॥

कोप करी आंगा वरी येतां पाहोनि चांडिका यातें ॥

कांपवि बांधुनि पाशें प्रबळा ही जेविं थंडि कायातं ॥३६॥

तत्काळ बद्ध होतां असुरांचा भुप रुप तें सोडी ॥

हरि होय तोंचि खंगें त्या शत्रुशिरासा ती सतीं तोडी ॥३७॥

तों खंग चर्म घर तो होय पुरुष परम दक्ष मायावी ॥

त्यासि शरांही मारी न च हरितां पर मद क्षमा यावी ॥३८॥

मग होय महागज तो गर्जे ओढी हरिस धरुनि करें ॥

कर तोडिला कृपाणें जैसा रंभाऽमिघानँ तरु निकरें ॥३९॥

पुनरपि हिता गमे त्या दुर्मातिच्या चाकरासि कासरता ॥

दुसरा मागें येतां अमरत्वाचा करा सिका सरता ॥४०॥

त्रैलोक्य तसें चि पुन्हा तो महिष क्षोभवुन मीनाच ॥

बहुधा म्हणे शिवा सुर मुनिस कलह लोभवु नभीं नाच ॥४१॥

कोपोनि जगन्माता पान करी अरुन लोचना मग ती ॥

हांसे पुनः पुन्हा पर भर वरुनि हर्षवावया जगती ॥४२॥

बळवीर्यमदोद्धत तो असुर हि गजोनि शैल शृंगानीं ॥

उडवी तिज वरि वरिलें जींचें पद पद्म साधुं भृंगानीं ॥४३॥

परमेश्वरी ही सोडुनि खरतर शर निकर बहु तिही तुर्ण ॥

द्वोषि प्रेषित पर्वत सर्व तदुत्साहसह करी चुर्ण ॥४४॥

कवि सुर गंधर्व जिच्या पद भक्ति प्राप्त पद नरा गाती ॥

अस्पष्टाऽक्षर बोले पानमदोद्भुत वदन रागा ती ॥४५॥

पीतें मधु तो मुढा गर्ज क्षण भरि घरुनियां गर्वा ॥

म्यां तुज वधितों येथें गर्जातिल क्षिप्त देवता सर्वा ॥४६॥

वदुनि असें उडुनि चढे पृष्ठा वरि जारि हि तो महिष झाडी ॥

पादें आक्रमण करुनि कंठिईं शुलें करुनि ती ताडी ॥४७॥

झाली त्रिभुवन सुखदा ते अति अद्भुत करुनि कर्म असी ॥

तों निज वदना पासुनि असुर निघाआ घरुनि चर्म असी ॥४८॥

अर्ध विनिर्गत होतां केला. तो आद्य शक्तिनें रुद्ध ॥

शुद्ध यशोर्थ तसा ही श्रीदुर्गेशीं करीं महायुद्ध ॥४९॥

तेव्हा दिव्य कॄपाणें मस्तक खंडन करुनि असु रहित ॥

तो महिष पाडीला श्री देवीनें जो सदैव असुर हित्त ॥५०॥

ज्या धाया सु कवि मनी निर्दयपत्यंककोपमा यावी ॥

वधिला देवीनें या परि तो अत्यंत कोप मायावी ॥५१॥

महिष वधें खळबळलें वातें बहि जेविं तोय खळबळतें ॥

हाहा ह्मणुनि पलायन पर चि निहतः शेष होय खळ बळतें ॥५२॥

सुरगण सकळ सबळ खळ महिष वर्धे जाहले परम हर्षीं ॥

स्तविती जगदंबेतं नारद सनकादि जे पर महर्षी ॥५३॥

जे नटति अप्सरोगण ते मोर चि गान तो अनघ न टाहो ॥

निववी यशोमृतातें वर्षुणि जी ती शिवा घन घटा हो ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP