संतचरित्रे - जनजसवंत

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


जनजसवंत भला । देवत याचे घरा गेला ॥१॥
येऊन राहातो चाकरी । पोटा मागतो भाकरी ॥२॥
स्त्री वाढावया गेली । वरचेवर विठठल झेली ॥३॥
काम सांगा सहज कांहीं । करितों मी लवलाहीं ॥४॥
मागें उरों नेदी कांहीं । कशाला गे माणुस बाई ॥५॥
दुबळ्याचे घरची नागवण । भाग्या घरची सांठवण ॥६॥
शेतांतील काम करी । विठो माझा नांगर धरी ॥७॥
खुटें पालख्या तोडी । साठ चाहुर पाणा झोडी ॥८॥
देव लाकडांसी गेला । परत घेवूनियां आला ॥९॥
पांचा साता गांवा गेला । लेंकी सुना घेऊन आला ॥१०॥
खांद्यावरी आणिल्या पाहीं । नवल याचें सांगों काइ ॥११॥
मायलेंकी केल्या भेटी । ऐशा विठोबाच्या गोष्टी ॥१२॥
कैसा प्रगटरे झाला । विठो माझा निघोन गेला ॥१३॥
आठवा आठवा माझा सखा । नामा सांगे सर्व लोकां ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP