मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
कावळ्यांचा स्पर्श शांति

धर्मसिंधु - कावळ्यांचा स्पर्श शांति

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


संकल्प, अग्निस्थापन इतके कर्म झाल्यावर कलशावर सुवर्णमय इंद्राची व लोकपालांची पूजा करावी. नंतर अग्नीवर चरु शिजवून पळसाच्या समिधा, चरु, आज्य व व्रीहि या प्रत्येक द्रव्याचा एक हजार आठ किंवा १०० "यतइंद्र०" या मंत्राने होम करावा; व लोकपाल देवतांस उद्देशून त्याच द्रव्याचा १०।१० आहुतींनी होम करून कुंभाच्या अग्रभागी लोकपालांचे बलिप्रदान व वायसास बलिप्रदान "ऐंद्रवारुण०" या मंत्राने करावे; व अभिषेकानंतर यजमानाने १०० किंवा दहा ब्राह्मणांस भोजन घालावे. घिरट, उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, आसन, पाट, मंचक, इत्यादिक एकाएकी फुटल्यास घृतांत भिजविलेल्या व मधुयुक्त असलेल्या अश्वत्थ समिधांचा प्रजापतीस उद्देशून होम करावा; व १००८ गायत्रीमंत्राने अभिमंत्रण करावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP