आज्ञापत्र - पत्र ७

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


N/Aपुढे पराक्रांत राज्य हस्तवश्य करावें त्यास संनिधवासी शत्रु म्हणजे उदरांतील व्याधी, त्याचा पराभव आधीं करावा या विचारें शामल केवल अन्यायाचेंच कारण, यवनेशाच्या मनोरथाचें साधन, त्याकरितां पहिले मुख्य शत्रूची कार्यसिद्धि विशेष जाली, किंबहुना या विषयसंधीमध्यें त्याणें कितेक देशदुर्गे आक्रमिलीं. मुख्य स्थळ रायगड म्हणजे तख्ताची जागा तो आक्रमिला. ब्राम्हणादि सकळ प्रजेस पीडा पावऊन भ्रष्ट केली. यैसे शत्रुची उपेक्षा करणें, आजीचें उद्यावरीं घालणें हे परम अनुचित आणि स्वामीसह परम असाध्य होऊन त्याचा उपराळा ताम्राकडून होणार. पहिले तीर्थरुप कैलासवासी स्वामीनें शामलावरी विग्रह केला त्या समयीं शामलाचा उपराळा ताम्राकडून जाहला. याकरितां शामल सावशेष उरला. अन्यथा त्यांचे यत्नांपुढे शामलानें अवशिष्ट उरावें अयिसे काय होतें ? कोण्ही येक स्थळ अथवा देश परिग्रह प्राप्त जाला असतां उपराळ्याच्या बळें निर्वाह करितो. तो उपराळा आधी तोडावा. त्याउपरीं त्याचा यत्न करावा. यैसी नीति आहे. याकरिता शामलाचे जहागिरीचा देश नंदुरबार आदिकरुन दळवटून फन्ना केला. ताम्राचा त्याचा विरोध घालोन तिकडून उपराळा होणार तो राहविला आणि त्यावरीं चालोन घेतलें. दर्यातून आरमार व खुष्कीनें लस्कर घालोन चौतर्फा यलगार करुन अवकाश घेऊं न देता त्याणें आक्रमिलीं स्थळे व राजपुरी आदिकरुन आक्रमून शामलाचे निर्नाम केलें. अनुपर्वे सावंतादि जे राज्यास कंटकभूत जाले होते त्यांचा नि:पात केला. अवशिष्ट वतनदार वरकड स्वतंत्र स्थळें करुन बद्धमूल आले होते ते भयभीत होऊन स्थळें सोडून देऊन शरण आले; त्यांस पूर्ववत स्वशासनवश्य केलें. म्हैसूरकरादि पाळेगारांसी यथोचित शिक्षा करुन प्रतिवार्षिक कारभाराचे नियमांवर आणून ठेविलें राज्य निष्कंटक जालें. इतकाही प्रसंग श्रीकृपेनें सिद्ध जाला.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP