मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ३५

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (३४१)

मोह मायेचा कीडा मानव मायेतच फसूनी गेला ।

मायेची हा स्वप्ने पाहतो ऐसा मायेमध्ये फसला ।

तन मन मायेने ग्रासीले तयार हे जखडूनी जाती ।

माया जाता रडती प्राणी येता आनंदे हंसती ।

मरते समयी कैसी प्राण्या साथ हिला घेऊन जाशी ।

'अवतार' म्हणे ही माया मिथ्या इथेच तू सोडुन जाशी ।

*

एक तूं ही निरंकार (३४२)

नम्र स्वभावे सदा असावे वचन असे या सदगुरुचे ।

विनम्र होऊनी जगी चालणे हेच दागिने शिष्याचे ।

नळापुढे नत मस्तक होतां तहान पाण्याने जाई ।

फळा फुलांनी वृक्ष बहरतां खाली तो वाकत जाई ।

पाणी उतरते वाहून अंती सागरास जाऊन मिळे ।

'अवतार' नम्रता धारण करता मानवास श्रीहरी मिळे ।

*

एक तूं ही निरंकार (३४३)

कोणी म्हणे प्रभाती उठूनी शीत जळे न्हाणे पूण्य ।

कोणी म्हणती तीर्थस्थानी नित्य नहाणे हे पुण्य ।

कोणी म्हणती घर त्यागुनी साधु होणे हे पुण्य ।

कुणी म्हणे मन शुद्धीसांठी शिकणे शिकविणे पुण्य ।

पाप पुण्य या झगड्यामाजी मानव हा फसूनी गेला ।

'अवतार' जयाने प्रभु जाणीला भेद तयाला हा कळला ।

*

एक तूं ही निरंकार (३४४)

राम शाम गोपाळ म्हणूनी करा तयांचा जयजयकार ।

वाहेगुरु अन म्हणती आल्ला लाख करा त्यांचा सत्कार ।

गॉड गॉड ही म्हणा हवेतर अनेक अकरा ऐसे उच्चार ।

तरी हरि ना होणे प्रसन्न बोलून तुमची होईल हार ।

पाहून याला ध्यान करी जो होईल त्याचा बेडापार ।

'अवतार' म्हणे की कलियुगी या नांव असे याचे निरंकार ।

*

एक तूं ही निरंकार (३४५)

पापाने जे धन मिळविले जाई न तें संगें अंती ।

जीवनात मानव हा समजे काळाची मज ना भीती ।

स्त्रिया पुत्र कुंटुबी सारे सर्व इथे राहुन जाती ।

आशेचे हे महाल सारे क्षणामध्ये ढळूनी जाती ।

मानियले तू ज्यास आपुले कांही तुझे हे नरा नसे ।

'अवतार' सदगुरु ज्ञानावाचून प्रभात कधीही होत नसे ।

*

एक तूं ही निरंकार (३४६)

येऊन करा प्रभुचे दर्शन हेच सांगणे जगताला ।

मानवता शिकवी सदगुरु मज ऐशा हैवानाला ।

पापी कपटी अन मुर्खाला प्रभुच्या संगे मिळवीतो ।

आहार अन जीवन मर्यादा सारी काही शिकवीतो ।

दूर करी सारी मन चिंता कमल मनाचे फुलवीतो ।

म्हणे 'अवतारी' सुयोग ऐस जीवा शिवा भेटी करीतो ।

*

एक तूं ही निरंकार (३४७)

मिथ्या सत्याचे हे झगडे काय सत्य परिभाषा असे ।

काय असे अविनाशी जगती नाशिवंत ते काय असे ।

मिथ्या मिथ्या म्हणसी ज्याला ओळखिले कां सत्याला ।

निर्मळ जे बहुमोल पवित्र जाणीयले कां तू त्याला ।

आत्म्याचा मळ धुवूं पहासी पावन पवित्र वेषाने ।

म्हणे 'अवतार' गुरुवीण सारे प्रयास हे व्यर्थची करणे ।

*

एक तूं ही निरंकार (३४८)

इच्छीत स्थान नसे जर ठावे पथिक होय भयभीत मनी ।

मृत्यु भय दुःखाची शंका ऐसा संशय येई मनी ।

कुठे जायचे कसे जायचे कांही होत नसे आभास ।

पाऊल टाकी पुढे परंतु मार्गाचा नाही विश्‍वास ।

ठाऊक आहे स्थान जयाला त्याच्या संकेता करवी ।

'अवतार' म्हणे भय मिटेल सारे सहजपणे इच्छीत मिळवी ।

*

एक तूं ही निरंकार (३४९)

सुख आशेच्या प्रेमी जनांनो जाणा सौख्य कशाचे नांव ।

सदैव दुःखाला घाबरला जाणा दुःख कशाचे नांव ।

व्याकुळ करते भूक अती जी जाणा भुक कशाचे नांव ।

इच्छित पुरवी सकल जीवांना कल्पवृक्ष कोणाचे नांव ।

शोध करितो ज्या वस्तुंचा वस्तु ती ठाऊक नसे ।

'अवतार' ठिकाणा जाणिल्पावीना गाठशील मुक्काम कसे ।

*

एक तूं ही निरंकार (३५०)

अग्नीने अग्नी विझवीण तीव्र अती अग्नी करणे ।

गटबाजीतुन ऐक्य शोधणे समया व्यर्थची घालविणे ।

नाश घृणेचा घृणा करूनी शक्य कधी नाही होणे ।

पंथामधूनी प्रभु शोधणे जीव आपुला घालविणे ।

एकाचा हा प्रचार मिथ्या जर ना एक जाणीयला ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीणा हरि कुणाला ना दिसला ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP