एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः ।

पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥२१॥

चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड ।

तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥१८॥

तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण ।

तेणें काळें म्यां प्रळयईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥१९॥

पंचभूताचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग ।

ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥५२०॥

जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू ।

भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥२१॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP