मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तेविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


परिभूत इमां गाथामगायत नराधमैः ।

पातयद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥४२॥

दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती ।

धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥७३॥;

तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।

उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥७४॥

तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती ।

सहजें उल्हासे निजशांति । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥७५॥

जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान ।

काय बोलिला भिक्षु आपण । तें निरुपण अवधारीं ॥७६॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP