मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तेविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् ।

भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥४१॥

भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक ।

तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥६८॥

भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक ।

देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥६९॥

यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक ।

तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥५७०॥

जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथें साह्य केल्या हरिहरांसी ।

भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥७१॥

कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी ।

तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP