मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् ।

देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥६॥

ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें ।

संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥३२॥

पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं ।

ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥३३॥

प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन ।

जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥३४॥

आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं ।

जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥३५॥

देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान ।

तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥३६॥

पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण ।

प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP