मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय आठवा|

एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।

न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥

निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली ।

अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥

जंव रसना नाहीं जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली ।

जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥

विषयाआंतील गोडपण । रसनेआंतील जाणपण ।

दोहींसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥

सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे ।

त्यासीचि रसना वश्य होये । रसअपाये न बाधिती ॥८६॥

रसनाजितांचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें ।

सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP