मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
सपिंडीकरण

धर्मसिंधु - सपिंडीकरण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


सपिंडीकरणानंतर त्याच्या श्राद्धामात्री भोजन करू नये. पहिल्या वर्षी भोजन केल्याने अस्थि इत्यादिकांचे भोजन करणारा, दुसर्‍या वर्षी मांसभक्षक; तिसर्‍या वर्षी रक्तभोजी व चौथ्यावर्षी ते श्राद्ध शुद्ध होय, याप्रमाणे प्रासंगिक विषय पुरे. आता प्राकृत विषयाचा विचार करू. पार्वणरूप असले तरी हिरण्यश्राद्ध व आमश्राद्ध ही श्राद्धे दिवसाचे दोन भाग करून पूर्वभागातच करावी. सर्व श्राद्धे त्याच्या त्याच्या निर्णात काली त्याच्या तिथीचा अभाव असला तरी करावी. कारण साकल्य वचनादिकांवरून व शास्त्रावरून त्या काली ती तिथी आहे असे 'कालत्व' विवेचन ग्रंथात सांगितले आहे. प्रातः काली व संगवकाळी वृद्धिश्राद्ध करावे. मध्यान्हकाल गौण आहे. अपराह्ण, सायान्ह व रात्री हे काल निषिद्ध होत. रात्री विवाह करावयाचा असता प्रातःकाल वृद्धिश्राद्ध केले नाही तर ते रात्रीही करावे, असे कित्येक ग्रंथात आहे. ग्रहण निमित्तक पार्वण श्राद्ध व पुत्रजन्म निमित्तक जातकर्मांगभूत वृद्धिश्राद्ध रात्रीही करावे. याप्रमाणे कालाचा निर्णय सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP