मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७१

क्रीडा खंड - अध्याय ७१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

देवांतकास वधुनी, दुसरे दिवशीं सभेंत स्वस्थानीं ।

काशीराजा बैसे, पुरवासीजन प्रधान यां बघुनी ॥१॥

बोले नृपती त्यांना, मम पुत्राचा विवाह करण्यास ।

अणिलें विनायकाला, होती उत्पात बहुत नगरास ॥२॥

निरसुन विनायकानें, संकट मुळ तें समूळ छेदियलें ।

आतां शांत समय हा, कार्य करुं कीं त्वरीत योजियलें ॥३॥

बोले प्रधान भूपा, अपुला हेतू सुयोग्य कीं आहे ।

आयती करणें आतां, देईं मत तेधवां नृपाळा हे ॥४॥

अनुमोदिलें जनांनीं, कार्याची सर्व सिद्धता केली ।

भूपति सुमुहूर्त पाहे, कार्यासी सर्व मंडळी आली ॥५॥

सुर मुनि भूपति सारे, जमले कार्यास तेधवां मोदें ।

अनुपम ऐशा थाटें, कार्य घडे कीं अविघ्नपणिं मोदें ॥६॥

एणेंपरि कार्यासी, सारुन झाला नृपाल बहु शांत ।

देउन विनायकाला, वस्त्राभरणादि भोजनासहित ॥७॥

तोषवुनि त्या भूपति, सुंदर रथ आणिला प्रभूसाठीं ।

कश्यपनंदन जातो, अपुल्या सदनीं म्हणून या भेटीं ॥८॥

कळतां मात जनांसी, आले नृपमंदिरांत ते सकळ ।

शोकाकुलीत झाले, स्तविती बहु भक्तिनें तया सकळ ॥९॥

प्रभुंनीं जनांस दिधला, धीर बहू शांतवीत त्यांलागीं ।

भूपति बरोबरी त्या, पोंचविण्या जातसे गृहालागीं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP