मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
संध्येचा काल

धर्मसिंधु - संध्येचा काल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


प्रातःकाली नक्षत्रे दिसत असता संध्या करणे हा उत्तम काल, नक्षत्रे अदृश्य होत असता मध्यम काल आणि सूर्योदय झाल्यानंतर कनिश्ठ काल, याप्रमाणे प्रातःसंध्येचे तीन काल आहेत. सायंकाळी सूर्य असता संध्या करणे हा उत्तम काल, सूर्यास्त झाल्यावर मध्यम काल आणि नक्षत्रे दिसू लागल्यावर कनिश्ठ काल याप्रमाणे सायंसंध्येचे तीन काल जाणावे. दीड प्रहर दिवसापासून संध्याकाळपर्यंत माध्याह्नसंध्येचा काल जाणावा. या सर्व संध्या नदी इत्यादिक असेल तर बाहेर करणेच प्रशस्त होय. साग्निक असेल तर त्याने प्रादुष्करण (अग्नि प्रदीप्त करणे) इत्यादिकांच्या अनुरोधाने सायंसंध्या व प्रातःसंध्या घरी कराव्या.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP