मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
उपनयनसंस्कार

धर्मसिंधु - उपनयनसंस्कार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


उपनयन म्हणजे - आचार्याच्या जवळ नेणें व (त्याच्याकडून) गायत्रीचा उपदेश करविणें हें ज्यांत मुख्य अंग आहे तें कर्म. हा (उपनयन) शब्द योगरुढ (व्यवहारी भाषेंत निराळ्या अर्थानें आलेला ) आहे. उपनयनाचें कर्म खरें पाहिलें तर अधिकारयुक्तेतेनें पित्यानेंच करावें. त्याच्या अभावीं चुलत्यानें किंवा (चुलत्याच्या) अभावीं (वडील) भावानें, तें कर्म करावें. वडील भाऊहि नसेल तर (तें कर्म) मामा वगैरे असगोत्र व सपिण्ड यांनीं करावें. तेही न सांपडल्यास हें कर्म असपिण्ड व सगोत्र यांनीं हें कर्म करावें. (यांत खरें मर्म गोत्राचें आहे.) कर्म करणारे सर्व हें कुमारापेक्षां वयानें अधिक असावेत; कारण, कमी वयाच्यानें केलेल्या उपनयनाचा निषेध सांगितला आहे. वर सांगितल्यांपैकीं जर कोणीही नसेल, तर हें कर्म श्रोत्रियानें करावें. ज्याचे संस्कार जाले तो द्विज. वेदाध्ययन झालेल्या ब्राह्मणाला विप्र म्हणावें. ज्या ब्राह्मणाचे संस्कार होऊन वेदाध्ययनहि झालें असेल तो श्रोत्रिय होय. उपनयन करणारानें तीन कच्छ्र प्रायश्चित करावें. उपनयनाचा अधिकार देण्यासाठीं गायत्रीचा १०१२ जप करावा. कित्येक १२००० जप करतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP