मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
नवरात्राचे गौणपक्ष

धर्मसिंधु - नवरात्राचे गौणपक्ष

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


तृतीयेपासून नवमीपर्यंत सात दिवस नवरात्र करावे. पंचमीपासून नवमीपर्यंत पाच दिवस नवरात्र करावे. सप्तमीपासून नवमीपर्यंत तीन दिवस नवरात्र करावे. अष्टमीपासून नवमीपर्यंत दोन दिवस नवरात्र करावे. एकच दिवस जर नवरात्र करायचे असेल, तर केवळ अष्टमी अथवा नवमी या दोहोंपैकी एके दिवशी करावे. आपापल्या कुलाचाराप्रमाणे, अथवा प्रतिबंधामुळे पहिल्या पक्षाचा जर संभव नसेल, तर त्याप्रमाणे या पक्षाची व्यवस्था समजावी. यामध्ये तृतीया व पंचमी यांचा निर्णय सप्तमीप्रमाणे समजावा. सप्तमीचा निर्णय पुढे सांगेन. वर सांगितलेल्या पक्षाचे ठिकाणी जर तिथीचा क्षय अथवा वृद्धि यामुळे दिवसाचे आधिक्य अथवा न्यूनत्व जर होत असेल, तर पूजा इत्यादिकांची आवृत्ति म्हणजे (तिथीची वृद्धि असल्यास दोन्ही दिवशी एकेकदा पूजा करावी व क्षय असल्यास एकाच दिवशी दोनदा) पूजा करावी. कोणी कोणी क्षयाच्या दिवशी पूजा व चंडीपाठ ही आठाठदा करतात. हे देवीपूजनात्मक नवरात्र नित्य व काम्यही आहे. याचे कारण असे की, ते न केल्यास दोष सांगितला असून, केल्यास फल प्राप्ति सांगितली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP