मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अनंतव्रत

धर्मसिंधु - अनंतव्रत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचे दिवशी अनंतव्रत करावे. त्याविषयी सूर्योदयकाली सहा घटिका व्याप्ति असलेली चतुर्दशी घ्यावी हा मुख्य पक्ष. तसा अभाव असेल तर चार घटिका व्याप्ति असणारी घ्यावी हा अनुकल्प जाणावा. चार घटिकांहून कमी चतुर्दशी असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन दिवस सूर्योदयकाली व्याप्ति असेल तर पूर्व दिवशी संपूर्ण व्याप्ति आहे,. याकरित पूर्व दिवसाची घ्यावी. या व्रताविषयी पूर्वाह्नकाल मुख्य कर्मकाल होय. त्याच्या अभावी मध्याह्नकाल घ्यावा. या व्रताविषयी सुवर्णाचे प्रतिमेचे ठिकाणी अथवा चौदा ग्रंथींनी युक्त अशा दोरकाचे ठिकाणी अनन्ताचे पूजन करावे. पूजन, उद्यापन इत्यादि विधि कौस्तुभ वगैरे ग्रंथामध्ये पहावा. पूजन केलेल्या दोरकाचा नाश होईल तर गुरु वरुन त्याच्या अनुज्ञेने यथाशक्ति कृच्छ्रादि प्रायश्चित्त करावे आणि घृताचा १०८ होम द्वादशाक्षर अशा वासुदेवमंत्राने करावा व केशव इत्यादि चोवीस नामांनी एकेक अशी आहुति देउन होमशेष समाप करावा. नंतर नवीन दोरकाचे ठिकाण पूर्वीप्रमाणे पूजा वगैरे करावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP