मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
समर्थ आहे भारतभूमी , समर्...

बालगीत - समर्थ आहे भारतभूमी , समर्...

मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्‍ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्‍ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.


समर्थ आहे भारतभूमी, समर्थ सेनादळे

’सदैव असतो जय सत्याचा’ इतुके आम्हां कळे

लोकशाहिचे सदा समर्थक, आम्ही भारतवासी

शांतिप्रिय जन, स्नेह आमुचा सार्‍या जगताशी

हुकुमशाहिशी मात्र मित्रता मुळी न आम्हां जुळे

स्वातंत्र्यास्तव लढती, त्यांचे आम्ही पाठीराखे

चळे न अमुची निष्‍ठा, अरिच्या शस्‍त्राच्या धाके

अन्यायाची उखडून काढू, छाया, पाळे-मुळे

नसे कुणाशी वैर आमुचे, नको दुजी भूमी

तत्‍त्‍वासाठी साहाय्य होतो, दुबळ्यांच्या कामी

निरापराध्या होता पीडा, हृदय आमुचे जळे

विजयी सेना, विजयी जनता, विजयी जननेते

तरी न आम्ही, कधी आक्रमक कोणाचे जेते

समान सारे देश आम्हांला, सारी मानवकुळे

N/A

References :

कवी - ग.दि.माडगूळकर

Last Updated : July 28, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP