कोठें मुली जासि ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत

न्हालें जगत्‌ काय क्षीराब्धि फेनांत ? ध्रु०

या काळवेळेस निघतात वेताळ

नाचोन खिदळोन बेताल गातात ! १

बाई, शरीरास उन्मादकर वास

तो आवडे यांस येतील अंगांत ! २

गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक

मातींत राबोन स्वगृहा परततात. ३

तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग

टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ४

घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट

स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ५

हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस

चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ६

तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?

या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP