मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
गोंधळाचें घर

गोंधळाचें घर

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


त्या दारावरुनी कोण निघे ?

वाराही चोरापरी रिघे. ध्रु०

निद्रारस संध्या न शिंपडे,

चंद्र शांतिचा सडा न तिकडे

करुनी निसटे चोरसा गडे,

नभ उघडुनि डोळे कधिं न बघे. १

सुवास-सुरिं गे फुलें न गाती,

परस्परीं नच कधिं कुजबुजती,

सुखदुःखाच्या गोष्टि न करिती,

यम घुमटीं काळी घोंगडि घे. २

तिथे न मानव, भुतेंच जमती,

न कळे खिदळति किंवा झुंजति,

नाण्याच्या नादावर नाचति,

गे विचित्र चाळे ते अवघे ! ३

आपण फिरकूं तिथे न सुंदरि,

बसोनि राहूं गे घरचे घरिं,

घरींच घुमवूं गोड बांसरी,

कधिं नांवही न त्या घरचें घे. ४

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - बागेश्री

इंदूर, ता. २४ नोव्हेंबर १९२०


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP