शाहीर हैबती - रामायण

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


( उत्तर )
पिंडीं कोण दैवते रामलक्ष्मण भरतासी ।
याचा पर्या कसा सांगतो निवडुन अर्थासी ॥ध्रु०॥
पिंड तीन तांदुळ साठ वीस होते एकांत ।
त्यांत साठ दैवतें पुढें सांगीत यमकांत ।
एक पिंड तो दोन शतेंच्याळीस जव जोकांत ।
सवा तोळा वजन असे आहे वाल्मिक श्लोकांत ।
ऐकावी दैवते ग्रन्थ अन्वयी मतितार्थासी ॥१॥
नवनारायण भास्कर दहावा दैवत रामासी ।
शेषी मंगळ गण अष्ट असे भरताचे नामासी ।
वरुण अष्टवसु कुबेर शत्रुघन आजमासी ।
पुढील दैवते आतां परीसावीं वचनार्थासी ।
याचा पर्या कसा सांगतो निवडुन अर्थासी ॥२॥
सत्वचिरंजीव रुद्र एकादशी मारुतिची भरती !
विवेक भक्ति दोन्ही विज्ञातील पूर्विच अवतरती ।
बिभिषण त्रिजटा दोनोसी ते त्यातील जमा धरती ।
मूळ काव्यार्थ अन्वये शुकाचार्याची टिका वरती ।
समजीची खुण पाहावी शिवरामायण ग्रंथासी ॥३॥
तांदुळ दैवत पिंड वजन कथिले अर्थावरून ।
नये प्रत्ययांतरीं घ्या ग्रन्थीं शोध करून ।
कवि हैबती करि कवन ग्रंथाची सड धरून ।
नाथनिरंजन वरद अक्षर येति रसभरून ।
कृपा आहे परिपूर्ण मने आठवि गुरुनाथांसी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP