मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
दहावे दिवसाची क्रिया

दहावे दिवसाची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


काकबलि दररोज ज्याठिकाणीं पिंड दिले त्याठिकाणी अगर दुसरे ठिकाणीं त्रिकोणाकृति वेदी करून ती शेणानें सारवून तीवर, हळद, गुलाल, इत्यादि घालून कर्त्यानें मध्यें एक व त्याचे चार दिशांस चार असे उदकुंभ मांडावे. त्यावर पिंड, छत्र, पोळी, पताका, पादुका, ही अस्थिसंचयन श्राद्धाप्रमाणें ठेवावी. मधला उदकुंभ प्रेतास, पूर्वेकडील प्रेतमित्रांस, दक्षिणेकडिल वैवस्वत यमास, पश्चिमेकडील वायसास व उत्तरेकडील प्रेताधिपति रुद्रास, याप्रमाणे पदार्थ तहान भूक शांत होण्यासाठीं द्यावे. पश्चिमेकडील पिंडास कावळा शिवेपर्यंत तेथें राहावें. कावळा शिवल्यावर, अश्म्याला तेल व तीळ लावून तो पाण्यांत टाकावा; ( कित्येक याचवेळी प्रेतत्व निवृत्तिसाठीं दशदानें करतात. ) व कर्त्यानें आप्तस्वकीयांची प्रार्थना करावी की प्रेताच्या नांवानें आपण उदकांजलि द्यावी; व प्रेताला उद्देशून त्यांणी तीरावर एक एक किंवा तीन तीन उदकांजलि द्याव्या. ( मृताबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा क्रियेला उद्देश आहे. ) पुत्र वगैरेनी क्रियेकरितां घेतलेल्या वस्त्रांचा त्याग करावा व क्षौर करावें. व सर्वांनीं देशाचाराप्रमाणें वाटलेल्या पांढर्‍या मोहर्‍या किंवा वाटलेले तीळ व आंवळकाठी अंगास लावून सर्वांनीं एकदम मस्तकावरून स्नान करावें. आणि मौन धारण करून बैल, गाय, सोनें यांस शिवून पांढरें वस्त्र नेसून घरी जाऊन भोजन करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP