मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ८२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘स एव’’ कारंडवचकोराणां पिंगलाकुरस्‍य च। भारद्वाजादिकं हत्‍वा शिवं पूज्‍य विशुध्यति।
‘‘पराशरः’’ भारुंडचाषभासांश्र्च पारावतकपिंजलं। पक्षिणां चैव सर्वेषामहोरात्रमभोजनम्‌।
‘‘यत्तु संवर्तः’’ चक्रवाकं तथा क्रौंचं तित्तिरं शुकसारिके। गृध्रं श्येनमुलूकं च तथा पारावतानपि।
टिट्टिभं जालपादं च मद्गुं कुक्‍कुटमेव च। एवं पक्षिषु सर्वेषु दिनमेकमभोजनं।
‘‘यदपि पराशरः’’ क्रौंच सारसहंसांश्र्च चक्रवाकं च कुक्‍कुटं। जालपादं च शरभमहारात्रेण शुध्यति। ‘‘यदपि स एव’’ गृध्रश्येनशशदीनामुलूकस्‍य च घातकः। अपक्काशी दिनं तिष्‍ठेत्‍त्रिकालं मरुताशन इति तत्‍कामकृतवधपरं।
‘‘यत्तु संवर्तः’’ हंस बकं बलाकां च श्र्वाविधं बर्हिणं तथा।
सारसं चाप भासं च हत्‍वा त्रीन्दिवसान्क्षिपेत्‌ इति तदभ्‍यासपरमिति माधवः।
‘‘यत्त्वंगिराः’’ काके भासेच गृध्रे च टिट्टिभे खंजरीटके। यथा गवितथाहत्त्या भगवानंगिरोऽब्रवीत्‌ इति तत्‍कामतोऽत्‍यंताभ्‍यासविषयम्‌

करडुवा, चकोर, पिंगळा भारद्वाज वगैरे पक्षी मारले तर प्रायश्चित्त.

‘‘तोच’’--- करडुवा, चकोर, पिंगळा, कुररी, भारद्वाज  वगैरेंस मारलें असतां शंकराची पूजा केल्‍यानें शुद्धि होईल. ‘‘पराशर’’---भारुंड, चाष, भास, पारवा व कपिंजल आणि सर्व प्रकारचे पक्षी यांस मारलें असतां एक दिवस उपास करावा. ‘‘जें तर संवर्त’’ चक्रवाक, क्रौंच, तित्तिर, पोपट, साळुंकी, गिधाड, ससाणा, घुबड, पारवे, टिटवी, जालपाद, पाणकावळा, व कोंबडा, या प्रमाणें सर्व पक्षांच्या वधाविषयी एक दिवस उपास करावा आणि ‘‘ जे पराशर’’ क्राच, सारस, हंस, चक्रवाक, कोंबडा, जालपाद व शरभ यांस मारलें असतां एक दिवस उपास केल्‍यानें शुद्धि होते आणि ‘‘ जें तोच’’ गिधाड, ससाणा, ससा वगैरे व घुबड यांचा वध करणारानें त्रिकाळ वायूचें भक्षण करणारा असा होत्‍साता शिजवलेलें न खातां (अन्न न खातां फळें वगैरे खाऊन) एक दिवस रहावें’’ असें म्‍हणतो, तें बुद्धिपूर्वक केलेल्‍या वधा विषयीं जाणावे. ‘‘जें तर संवर्त’’ ‘‘हंस, बगळा, बाळढोक, साळई, मोर, सारस, चाष व भास यांस मारे तर तीन दिवस उपास करावा’’ असें म्‍हणतो तें अभ्‍यासा विषयीं जाणावें असें माधव म्‍हणतो. ‘‘ जें तर अंगिरस्‌’’ कावळा, भास, गिधाड, टिटवी व खंजरीट यांच्या (वधा) विषयीं जशी गाईची हत्त्या तशी (हत्त्या) जाणावी असें भगवान्‌ अंगिरसानें सांगितले’’ असें म्‍हणतो तें बुद्धिपूर्वक अत्‍यंत अभ्‍यासा विषयीं जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP