रूपक - जातें

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


संसार घन घनदाट । कैं होईल शेवट जातीयाचा ॥१॥
जीव हेंचि जातें कर्म ह्राचि खुंटा । वोढिती बरवंटा चौघीजणी ॥२॥
जातां वैरू वैरणें जंव आहे लहाणे । जातां जाईजणें जाईल जाणा ॥३॥
एकोत्तरशें कौरव वैरिले वैरणा । यांचा पांडावा जाणा तेंचि झालें ॥४॥
नळनीळ मांधाता वैरियले जातां । निमिष न लागतां पीठ झालें ॥५॥
संसाराचा वोढा वोढितां न वोढे । बैस पैलकडे लावीं हात ॥६॥
नामा म्हणे विठोबा दिनाचें माहेर । सदा पंढरपूर गाऊं गीतीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP