मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|
नक्र उद्धार

नक्र उद्धार

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


नक्र बोले ऐकें ह्रषिकेशी । नाममात्रे तारिलें गजेंद्रासी ।
काय कृपें झालें मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥
कळलें तुझें देवपण आतां । सोदीं ब्रीद आपुलें दीनानाथा ॥ध्रु०॥
दीनानाथ म्हणविसी कशासाठीं । द्वैतभाव त्वां धरियेला पोटीं ।
कैसें पाप लाविलें माझें पाठीं । तुझें रूप देखिलें आजि द्दष्टि ॥२॥
दिनानाथ बोलती वेद चारी । साधुसंत गाताती नानापरी ।
सत्य ब्रीद मिरवत चराचरीं । सोडीं ब्रीद आपुलें झडकरी ॥३॥
रज मात्रें तारिली अहिल्या शिळा । नामें करुनि उद्धरिलें अजामेळा ।
पापी कैसा मी घननीळा । तुझें रूप देखिलें म्यां आजि डोळां ॥४॥
न्याय ब्रीद घेईन तुझें आतां । पापी कैसा मी सांग दीनानाथा ।
कैसें पाप मारिलें माझ्या माथां । अझूनि लाज कां नये तुझ्या चित्ता ॥५॥
नक्र बोले देवासी हांसू आलें । निंदा नोहे स्तवन माझें केलें ।
दीनानाथें तात्काळ उद्धरिलें । विष्णुदास नामा कौतुक बोले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP