भक्तवत्सलता - अभंग १

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥
ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥
समुद्र मंथनीं मंदर बुडाला । कूर्मरूप झाला तयेवेळीं ॥४॥
हिर-ण्याक्ष धरा नेतां रसातळ । वराहरूपें त्याला वधियेलें ॥५॥
प्रल्हा-दासी पिता गांजी नानापरी । स्तंभीं नरहरी प्रगटला ॥६॥
देव-काजीं झाला वामन भूतळीं । बळीसी पाताळीं घातियेला ॥७॥
भूमिभार झाला क्षत्रियांचें कुळ । केलेंसे निर्भूळ परशुरामें ॥८॥
सीतेचिया काजा रावण मर्दिला । सूर्यवंशीं झाला रामचंद्र ॥९॥
गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा । होऊनि पांडवां साह्यकारीं ॥१०॥
व्रतभंगासाठीं बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये ॥११॥
कलंकि अवतार होणार श्रीहरि । तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥
नामा ह्मणे तुझे अनंत अवतार । तेथें मी पामर काय वर्णूं ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP