लळित - पदे ५० ते ५५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥५०॥ अंजनीगीत ॥ लंकेहूनि अयोध्ये येतां राम लक्षूमण सीता । हनुमंतें अंजनी माता । दाखविली रामा ॥१॥
चवघें केला नमस्कार । काय बोले रघूवीर । तुझ्या कुमरें आम्हां थोर । उपकार केला ॥२॥
सीताशुद्धी येणें केली । लक्षुमणाची शक्ति हरिली । लंका जाळूनि निर्दाळीली । राक्षससेना ॥३॥
अहिरावण महिरावण ॥ घात करिती आमुच्या प्रारणा । देवीरूपें दोघांजणां । रक्षिलें माते ॥४॥
अठरा पद्में वानरभार । श्रमें युद्ध केलें फार । शिळा सेतू सागर । समाप्त केला ॥५॥
माते तुझ्या उदरीं जाण । हनुमान जन्मल रत्न । एवढें माझें रामायण । याचेनि योगें ॥६॥
ऐकून पुत्राची ही स्तुति । माता तुच्छ मानी चित्तीं । व्यर्थ कां बा रघुपती । वाहसी भार ॥७॥
हा कां माझ्या उदरीं आला । गर्भाहूनि नाहीं गळाला । आपण असतां कष्टविला । श्रीराम माझा ॥८॥
माझिया दुग्धाची प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी । रावणादिक हे बापुडीं । घुंगुरटीं तेथें ॥९॥
असत्य रामा वाटेल बोली । दुग्धधारा सोंडियेली । शौला उदरीं खोचविली । त्रिखंड तेव्हां ॥१०॥
वेणी दंड परताळिला । लंकेलागीं वेढा दिधला । आणुनी रामासी दाखविला । अंजनी मातें ॥११॥
सींता बोले अंजनीसी । कां कोपशी बाळकाशीं । रामें आज्ञा हनुमंतासी । दिधली नव्हती ॥१२॥
आश्चर्य वाटलेंसें रामा । म्हणे माते धन्य महिमा । पादपद्में चवघांजणां । वंदिलें भावें ॥१३॥
अत्यंत जिवलग सख्या । हनुमंत भक्त निका । रामदास-पाठीराखा । महारुद तो ॥१४॥

॥५१॥ गणपति गणराज धुंडिराज महाराज । चिंतामणि मोरेश्वर याविण नाहीं काज ॥ध्रु०॥ अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार । ब्रह्मा विष्णु महेश हे तरि तुझेच अवतार ॥१॥
त्रिगुण तूं गुणातीत नामरूपाविरहित । पुरुषनाम प्रकृतींत अंत नाहीं हा ॥२॥
सच्चिनदानंद देवा । आदि अंत तुलचि ठावा । दास म्हणे वरट भावा । कृपादृष्टीं हा ॥३॥

॥५२॥ प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे । आगमनिगम संतसमागम सद्रुरुवचनें पाहे ॥ध्रु०॥ आत्मविचारें शास्त्रविचारे गुरुविचारें बोध । मीपण तूंपण शोधूनि पाहतां आपणा आपणा शोध । प्रगट० ॥१॥
जडासि चंचळ चालविताहे चंचळ स्थिर न राहे । प्रचीत आहे शोधूनि पाहे निश्चळ होऊनि राहे ॥२॥
भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवणमनन साधा । दास म्हणे निजगुज शोधितां होत नसे भवबाधा ॥३॥

॥५३॥ पाहा पाहा या जगांत राम आहे । राम आहे राम आहे राम आहे ॥ध्रु०॥ जग हें अवघें रामच सारा । अंतरीं पाहे करी विचारा ॥१॥
एक सुवर्णीं बहु अळंकारा । तद्बत पाही सर्व पसारा ॥२॥
विना कच्छू नाहीं थारा । रामच रामही घे घे सारा ॥३॥
दास म्हणे हा रामच भरला । भरला उरला बोलच खुंटला ॥४॥

॥५४॥ गुरुदातारें दातारें । अभिनव कैसें कैसें केलें ॥ध्रु०॥ एकचि वचनें न बोलत बोलूनि । मानस विलया नेलें ॥१॥
भूतसंगें कृत नैश्वर ओझें । निजबोधें उतरिलें ॥२॥
दास म्हणे मज मीपणविरहित । निजपदीं नांदविलें ॥३॥

॥५५॥ मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥ध्रु०॥ ब्रह्म निरंजन अद्वय सत्य । माया जनपर द्वैत अनित्य ॥१॥
पारखीवीण खरें निवडना । मूढ कसें जनहित कळेना ॥२॥
मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसें पय घे निवडोनी ॥३॥
दास म्हणे निज कौतुक मोठें । अनुभव बोलतां शाब्दिक खोटें ॥४॥ एकूण पदें ॥२३१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP