वारांची गीते - श्लोक प्रार्थनेचे

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


कृपाळूपणें भेटि दे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया । जनामाजिं लौकीक हाही न सूटे । उदासीन हा काळ कोटें न कंठे ॥१॥
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांड जीवी करावी । देहदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भजावें ॥२॥
सदा चक्रवाकासि मार्तंद जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३॥
भवाच्या भयें काय भीतोसि लंडी । धरींरे मना धैर्य धाकासि सांडीं । रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥४॥
स्वधामासि जातां महाराजराजा । हनुमंत तो ठेविला याचि काजा । सदा सर्वदा रामदासासि पावे । खळें गांजिल्या ध्यान सोडोनि धांवे ॥५॥
राम राम राम राम सितारम सिताराम । नंतर जयजयकार ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP