वारांची गीते - अभंग वैराग्यपर

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ अभंग वैराग्यपर ॥
अंतीं एकलेंचि जावें । तरी राघवीं भजावें ॥१॥
माता पिता बंधु जन । कन्या पुत्रही सोडून ॥२॥
जन्मवरी केला भार । सेखीं सांडोनि जोजस ॥३॥
म्हणे रामीं रामदास । सर्व सोडोनियां आस ॥४॥

॥ अभंग ॥२॥ काम क्रोध खवळले मद मत्सर मातले ॥१॥
त्यांचे आधींनची होणें । ऐसें केलें नारायणें ॥२॥
लोभ दंभ अनावर । झाला गर्व अहंकार ॥३॥
दास म्हणे सांगों किती । पडली ऐशीयांची संगती ॥४॥

॥ अभंग ॥३॥ देवें जन्मासि घातलें । नाना सुख दाखविलें ॥१॥
त्यासि कैचें विस-रावें । पुढें कैसेनी तरावें ॥२॥
कुळ समूळ सांभाळिलें । नाना प्रकारीं पाळिलें ॥३॥
दास म्हणे देवावीन । दुजा सांभाळीतो कोण ॥४॥

॥ अभंग ॥४॥ पुढें होणार कळेना समाधान आकळेना ॥१॥
मना सावधान व्हावें । भजन देवाचें करावें ॥२॥
ऋणानुबंधाचें कारण । कोठें येईल मरण ॥३॥
रामीं रामदास म्हणे । भजनें अमरचि होणें ॥४॥ ॥ वैराग्यपर अभंगसंख्या ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP